पारस बाल भवन

+91 8652069665/ 9870683250

आमच्याबद्दल जाणून घ्या

भारतमाता बहुउद्देशीय महिला मंडळ

'भारतमाता बहुउद्देशीय महिला मंडळ' या संस्थेच्यास माध्यमातून गेल्या मागील २० वर्षापासून समाजाच्या विविध स्तरांवर कार्यरत असतांना आदिवासी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करणे त्यांना रोजगार मिळवून देणे. कारागृहात कैद्यांना ध्यान योग साधना प्रशिक्षण, पूरसद्दश्य नैसर्गिक आपत्तींच्या काळात लोकांना मदत करणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वःसंरक्षण प्रशिक्षण शिबिर चालविणे. विभागीय रस्ते, प्लॅटफॉर्म, पूल यांवर स्वच्छता मोहिम राबविणे या प्रकारची कामे वेळोवेळी करतो. हे करीत असताना आम्हाला असे आढळून आले की फुटपाथ, रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्टॅण्ड व झोपडपट्टी यावर राहणारी मुले आणि मुली यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. उदरनिर्वाहाचे योग्य साधन नाही. त्यामुळे ओढविलेल्या बिकट परिस्थितीमुळे नाईलाजाने त्यांना भिक्षा मागणे, कचरा वेचणे, हमाली करणे, चोरी पाकिट मारणे, नशा करणे हेच मिळकतीचे मार्ग बनत चाललेले आहेत.
या बालभवनात फुटपाथवर राहणाऱ्या परिवारातील रेल्वे स्टेशन व झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांच्या मुलांचे तसेच पालकच नसलेल्या दुर्लक्षित ( वंचित व निराधार) मुलांचे पुनर्वसन करण्या बरोबरच त्यांचे शारिरिक व शैक्षणिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये त्यांना रोजगार प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे. समाजात त्यांना स्वाभिमानाने व सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहा सोबत जगण्यास मदत करणे. हा, हे पूनर्वसन केंद्र वस्तीगृह स्थापन करण्याचा मुळ उद्देश आहे. तरी या समाज - हिताच्या कार्यात आपले सहकार्य मिळावे.मुलांची बौद्धिक क्षमता विकसित करणे गुन्ह्यांपासून दूर ठेवणे स्वावलंबन शुद्ध चारित्र्य व संस्कार.मुलांच्या मनात देशासाठी प्रेम तयार करणे.
एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला नकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळेच तर आपल्यात उत्साह निर्माण होतो. आणि व उत्साहाच्या वळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुद्धा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिजे असता माणसाचे जीवन हे अशा आकांक्षावर अवलंबून आहे जीवनात आशा अस खूप महत्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय. त्यासाठी आपल्याला जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे. आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो.

आम्ही काय करतो?

आम्ही वंचित व निराधार मुलांचे जीवन सुखी करून त्यांच्या गरजा पूर्ण करतो

आरोग्यदायी अन्न

आम्ही वंचित व निराधार मुलांचे जीवन समृद्ध करण्यासाठी त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि खेळाकडे विशेष लक्ष देतो. मुलांना पोषक अन्न, दर्जेदार शिक्षण आणि दैनंदिन व्यायाम उपलब्ध करून दिला जातो. क्रिकेट, खो-खो, कबड्डी यांसारखे मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित केले जाते.

शुद्ध पाणी

आम्ही मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करतो. शुद्ध पाणी पिण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. भवनाच्या आवारात आरओ आणि फिल्टरद्वारे शुद्ध पाणी पुरवले जाते. मुलांना पाण्याचे महत्त्व समजावे यासाठी जागृती कार्यक्रम घेतले जातात.

आरोग्य सेवा

आम्ही वंचित व निराधार मुलांचे जीवन सुखी करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण करून त्यांना सुरक्षित आणि आनंदी भविष्य देण्याचा आमचा संकल्प आहे. आरोग्य सेवा, योग्य आहार आणि शिक्षण यावर आम्ही विशेष लक्ष देतो.

प्राथमिक शिक्षण

आम्ही वंचित व निराधार मुलांचे जीवन सुखी करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करतो. शिक्षण हा त्यांचा हक्क आहे, आणि त्यांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो. पुस्तके, शालेय साहित्य आणि योग्य मार्गदर्शन पुरवून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतो📚

निवास सुविधा

आम्ही वंचित व निराधार मुलांना सुरक्षित आणि आरामदायक निवास सुविधा प्रदान करतो. त्यांना घराचा अनुभव देण्यासाठी एक आदर्श वातावरण तयार करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि आरामदायक अन्नप्रक्रिया यावर आम्ही विशेष लक्ष देतो.

सामाजिक सेवा

आम्ही वंचित व निराधार मुलांसाठी सामाजिक सेवा क्षेत्रात काम करत आहोत, ज्यामुळे त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवता येतो. आम्ही त्यांना त्यांच्या गरजेनुसार मानसिक, भावनिक आणि सामाजिक समर्थन पुरवतो. तसेच, त्यांना समाजातील इतर लोकांसोबत समायोजन साधायला मदत करतो.

150

विद्यार्थी तयार केले

10

स्वयंसेवक

500

वंचित व निराधार मुलांची सेवा केली

50000

देणगी गोळा केली

कार्यक्रम

आमच्या संस्थेने विविध धर्मादाय कार्यक्रम आयोजित केले आहेत

Image

२६-जानेवारी-२०२५

8:00 - 10:00

टिटवाळा

पारस बाल भवनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण .

२६ जानेवारी २०२५ रोजी, टिटवाळ्यातील पारस बाल भवनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

पहा
Image

२७-ऑगस्ट-२०२४

8:00 - 10:00

टिटवाळा

पारस बाल भवनमध्ये दहीहंडी उत्सव

पारस बाल भवनमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मानवंदन दिले व गोविंदा पथकाने हंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पहा

एकदा नक्की भेट द्या.

सौ. संगिता गुंजाळ यांचा अल्प परिचय

Team Image

सौ.संगिता गुंजाळ (माई)

संस्थापिका

सौ. संगिता गुंजाळ (माई), भारतमाता बहुउद्देशीय महिला मंडळ (रजि.) या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. या मंडळाच्या अंतर्गत "परस बाल भवन" हे बालकेंद्र चालवले जाते. संगिता गुंजाळ यांनी गेल्या दहा वर्षांपासून या संस्थेचे नेतृत्व केले असून त्यांनी समाजसेवेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा समाजसेवेविषयी असलेला उत्साह आणि समर्पण उल्लेखनीय आहे. त्यांना लहान मुलांबरोबर वेळ घालवण्याची विशेष आवड आहे, आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सतत झटत असतात.
मुलांबरोबर वेळ घालवण्याची त्यांना आवड असून त्यांच्या विकासासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजाला सकारात्मक प्रेरणा मिळते.

स्वयंसेवक बना

चला, दुसऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडवूया.

आपल्या छोट्या मदतीमुळे अनेक लोकांचा जीवनात मोठा बदल होऊ शकतो. एकत्र येऊन, आपण एक चांगली समाज सेवा करू शकतो आणि अनेकांना एक नवीन आशा देऊ शकतो.तुमच्या योगदानामुळे गरजूंचे जीवन सुखकर बनू शकते.आजच दान करा आणि समाजात सकारात्मक बदल घडवा.

संपर्क साधा

कोणत्याही प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क करा.

पारस बाल भवन

भारतमाता बहुउद्देशीय महिला मंडळ (रजि.)

(वंचित निराधार बालकांसाठी सेवा कार्य)

नोंदणी क्र.: महा/७४९/०४/ठाणे एफ/१३५०२

संपर्क:

सौ. संगिता गुंजाळ (माई) - संस्थापिका

📞 8652069665 / 9870683250 / 9152135853

निवासी वस्तिगृह पत्ता:

जिल्हा परिषद शाळेजवळ, म्हस्कळ, टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे ४२१६०५.